🔥वसुसेन🔥
🔥वसुसेन🔥

@Mrutyyunjay

9 Tweets 3 reads Aug 26, 2023
आयुष्याच्या एका वळणावर आपल्यालाच जाणवायला चालु होत की "माझा मार्ग चुकलाय का? नेमकं काय चुकतय माझ्याकडुन? मलाच का वेळ लागतोय? मला हवय ते मिळेल का नाही??"
या विचारांनी तुम्ही एव्हढे त्रस्त होता की तुम्हाला झोप लागत नाही. रात्रभर विचार करत निपचित पडुन राहण्याची इच्छा होते तर पहाटे
आवर्जून जाग येते, आणि जेव्हा भल्या पहाटे जाग येते तेव्हा या नकारात्मक विचारांचे चक्र पुन्हा फिरायला चालु होते. अस वाटत की 'राव, आपल्याला आपल शरीर हे विचार येण्यासाठी मुद्दाम झोपेतुन उठवतय, रातभरपण झोपुन देत नाही..'
शेवटी आपल्या मनाची घालमेल व्हायला चालु होते, आपलं कशातच मन लागत
नाही. शांत शांत बसुन राहायला आवडत, संवाद साधण्याची इच्छा मरायला चालु होते, आपल्या लोकांसोबतही बोलणं जीवावर येत आपल्या..
अस वाटत सगळ सोडुन निघुन जावं कुठतरी शांत ठिकाणी..डोकं जड होत, मन गहिवरून येत..डोळे पाणावतात. असह्य व्हायला चालु होत सगळं..त्यात मनाच्या जखमेवरची खपली खपकन
कुणीतरी वरबडुन काढावी अश्या पद्धतीने कोणी बोललच(खासकरून टोमणेसदृश्य)..तर डोक्यात तीव्र सणक जाते, आपण लगेच रागाला जातो आणि त्या व्यक्तीला फडाफड बोलण्याची इच्छा होते!!
एका टप्प्यानंतर कष्ट करण्याची ताकद हळूहळू कमी व्हायला चालु होते आणि कष्टाची जागा थकवा घ्यायला चालु करत..शरीर
ढिल्ल पडत, मन खचत आणि अस वाटत की 'बस्स! बस्स आता..पुरे झाल'..
पण जेव्हा तुम्ही आजुबाजुला पाहता तेव्हा आपल्यापेक्षा दुप्पट वयाची लोकं दररोज चेहर्यावर स्मितहास्य घेऊन जीवनाशी दोन हात करायला बाहेर पडताना दिसतात..त्यांना तर आपल्यासारखं काहीच नसत. बर्याच जणांचे जीवनसाथी अर्ध्या
वाटेवर साथ सोडुन देवाघरी गेलेले असतात तर बर्याच जणांना त्यांच्या पोटच्या गोळ्यानं हाकलुन दिलेल असत..
त्यांना आजचा दिवस शेवटचाय का उद्याचा हे पण नक्की माहिती नसत..पण तरीही दररोजचा दिवस मानाने जगायला ते बाहेर पडतात..कोणतही कारण पुढे न करता!!
आयुष्य म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचे
उत्तर शोधता शोधता शेवटी आपला प्रवास 'स्मशानभुमी' जवळ येऊन थांबतो‌.कोण करोडपती असत तर त्याला अब्जाधीश व्हायच असतय‌..कोणाला दररोजचे शंभर रूपये कमवायच पडलेलं असतय..कोणाला दोनवेळच्या जेवणाची भ्रांत 🥲
आजुबाजुला बरेच 'स्ट्रगलर' असतात. कोणाला करिअरच टेंशन, कोणी तब्येतीशी झगडतय, कोणाला
आपल्या स्वकियांनी दोन हात करावे लागतात तर कोणाला पैशांच टेंशन..आपल्या 'स्ट्रगल'च रूप जरी वेगळं असल तरी लढण्याची उम्मेद मात्र जिवंत ठेवता आली पाहिजे!!
एखाद्याला 'मदत' जरी नाही करता आली तरी निदान त्याच्या पायात पाय घालण्याची वृत्ती तरी ठेऊ नका!!
कारण आज जो पायथ्याला आहे तो उद्या शिखरावर दिसेल तर जो आज शिखरावर आहे तो पायथ्याला आलेलं समजणार नाही..
#आयुष्य #संघर्ष ♥️

Loading suggestions...