Devashish Kulkarni
Devashish Kulkarni

@AjaatShatrruu

12 Tweets 23 reads Dec 13, 2021
#Thread : आणि देवगिरी वर भगवा जरीपटका फडकला🚩
होय, तोच देवगिरी.
यादवांची राजधानी.
राजमाता जिजाऊ आईसाहेबांच्या पूर्वजांची राजधानी.
शिवप्रभूंच्या अवतारापूर्वी असलेल्या समृद्ध हिंदुराज्याची राजधानी.
१/१२
इ.स.११८७ साली यादव कुळातील पाचव्या भिल्लम्मा राजा ने हा किल्ला बांधला.
पुढे १२९६ साली यवनांची वक्रदृष्टि यादवांच्या हिंदुसाम्राज्याव पडली.
कारा प्रांताचा सुभेदार असलेल्या अल्लाऊद्दीन खिलजी ने देवगिरी लुटलं. लूटलेल्या खजिन्यातूंनच त्याने दिल्लीचा तख्त मिळवला.
२/१२
इ.स.१३०८ मध्ये त्याने पुन्हा देवगिरीवर आक्रमण केले.
खिल्जीने त्याच्या सेनापती मलिक कफूरच्या नेतृत्वाखाली एक मोठे सैन्य यादवांच्या देवगिरीवर पाठवले.
यादव राजा रामचंद्रचा पराभव झाला. त्याला अलाउद्दीनची सरंजामशाही पतकरावी लागली.
३/१२
नंतर मलिक कफूरने रामचंद्र यादवाच्या मदतीने दक्षिणेतील अनेक राज्यांवर आक्रमण केले.
इ.स.१३१७ मध्ये देवगिरी पूर्णपणे यवनांच्या अधिपत्याखाली गेला. १३२८ मध्ये तर सुल्तान मुहम्म्द-बिन-तुघलक ने दिल्ली सोडून देवगिरीला आपली राजधानी बनवली आणि त्याचे दौलताबाद असे नामकरण केले.
४/१२
१३१७ ते १७६०, सुमारे ४५० वर्ष देवगिरी वर यवनांचे राज्य होते.
१३४७ मध्ये देवगिरी बाहामनीशाही कडे आला. १४९९ साली अहमदनगर च्या निजामशाही ने देवगिरीली त्यांची दुसरी राजधानी बनवले.
पुढे १६३२ साली मोगलांनी हा सगळा प्रदेश हस्तगत केला.
५/१२
एकेकाळी वैभवशाली हिंदुराज्याची असलेल्या या राजधानीवर, यवनांनी असंख्य अत्याचार केले.
देवळे उध्वस्त केली, जुलूमजबरदस्तीने हिंदुंचे धर्मपरिवर्तन करण्यात आले.
यादवांनी बांधलेले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर खिलजी ने पाडून टाकले.
६/१२
देवब्राह्मणप्रतिपालक मालोजीराजे भोसले यांनी घृष्णेश्वराचे देवालय पुन्हा बांधले पण औरंगजेबाने ते पुन्हा उध्वस्त केले.
हिंदुराज्याची राजधानी असलेला देवगिरी मराठ्यांनी जिंकला.
श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी १७६० साली गोपाळराव पटवर्धन यांना देवगिरी जिंकण्याकरिता आज्ञा केली.
७/१२
नानासाहेबांच्या मनात देवगिरी जिंकण्याचे मानस किती पक्के होते हे या खालील पत्रावरुन कळतं.
अनेक दिवस गोपाळराव पटवर्धन देवगिरी जिंकण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना काही यश मिळत नव्हते.
नानासाहेबांचा धीर सुटत चालला होता.
८/१२
नानासाहेबांनी या पत्राद्वारे आपला मितभाषी स्वभाव बाजूला ठेवून गोपाळरावांना चांगलंच खडसावलं होतं.
मोगलांनी मराठ्यांना अडकाठी केली तर “मोंगल दक्षिणेंत होता की नव्हतासा करुं”! अशी भूमिका नानासाहेबांनी घेतलेली.
९/१२
आपल्या सरदारांचा मान नानासाहेब सदैव राखत असत.
या पत्रांद्वारे जरी नानासाहेबांनी गोपाळराव पटवर्धनांना सुनवलं असलं तरी देखील याची खबर इतर कोणाला लागू दिली नाही.
“लेंकरादाखल सेवकावर एकांता रागें भरल्यास वाईट मानू नये” - या वाक्यातून श्रीमंतांचा प्रेमळ स्वभाव दिसून येतो.
१०/१२
श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या मुत्सद्दी राजकारणामुळे देवगिरी जवळ-जवळ ४५० वर्षांनी पुन्हा हिंदुराज्यात आले.
मराठ्यांनी देवगिरी फत्ते केली - ही घटना काही सामान्य नव्हती.
स्वर्गात जिजाऊ आईसाहेबांना आणि शिवछत्रपतींना किती आनंद झाला असेल याची कल्पना करुनंच अंगावर शहारा येतो.
११/१२
धर्मधुरंधर श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी देवगिरी हस्तगत केल्यावर त्या प्रांतात हिंदु धर्माची जणू पुनर्स्थापनांच केली.
या संबंधीच्या अनेक अप्रकाशित नोंदींवर इतिहास संशोधक आणि लेखक @RajMemane आज भारत इतिहास संशोधक मंडळात होणाऱ्या पाक्षिक सभेत प्रकाश टाकणार आहेत.
१२/१२

Loading suggestions...